Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार थंड असेल तर आता आम्हीच बंड करू, चित्रा वाघ यांचा सरकारला इशारा!

Webdunia
शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (14:49 IST)
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम हॉस्पिटल परिसरात ११ कवट्या आणि ५२ हाडे सापडली आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यात अजूनही अपहरण करणारी टोळी धुमाकूळ घालत असून, आता अल्पवयीन मुलींच्या अवैध गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आले आहे. चिमुकल्या जीवांशी खेळण्याची ३०-३० हजारांत सौदेबाजी चालली आहे. यावरून आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड, असा चित्रा वाघ यांनी इशारा दिला आहे.
 
वर्ध्यातील आर्वी येथे एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. ती गरोदर राहिली आणि आरोपीने तिला गर्भपातासाठी नेले. ३० हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचे ११ जानेवारीला कळले. आर्वी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता परिसरात काही कवट्या, हाडे व गर्भ आढळून आल्याने त्यांना धक्काच बसला. तेथे किती अवैध गर्भपात झाले? किती मुले मारली गेली? किती चिमुकल्यांची हत्या झाली? ते सांगता येत नाही, असे सांगत वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का, 13 'आप' नगरसेवकांनी दिले राजीनामे

बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे

चप्पलमध्ये लपवून सोने तस्करी करणाऱ्या नागरिकाला डीआरआय ने मुंबईत ताब्यात घेतले

LIVE: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी

धक्कादायक : लग्नाच्या सहा दिवसांनीच मारहाण करून नववधूची हत्या

पुढील लेख
Show comments