Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भर दुष्काळात लातूरच्या त्या विहिरीकडे दुर्लक्ष, भागवली होती ७२ सालात तहान

Webdunia
बुधवार, 29 मे 2019 (18:03 IST)
फाईल फोटो
प्रशासन जागे नसेल तर कश्या प्रकारे अडचणी वाढतात याचा उत्तम नमुना दुष्काळी लातूरमध्ये पहायला मिळतो आहे. ही बातमी आहे एका विहरीची जी शहरातील मध्यभागी असून भर उन्हात त्यात चक्क पाणी आहे. मात्र या विहरीकडे मनापा आणि त्या भागातील नगरसेवकाने इतके दुर्लक्ष केले आहे कि त्या विहारीतील पाणी खराब झाले आहे. 
 
लातूर शहरातील गोरक्षणच्या १०५ फुटी ऐतिहासिक विहिरीत ७० ते ७५ फूट पाणी अजूनही दिसते आहे. जर येथून पाणी उपसल तर पुन्हा विहीर परत भरते,  या विहिरीनं १९७२ च्या दुष्काळात लातुरकरांची तहान भागवली होती, मात्र  नंतर विहिरीचा उपयोग फक्त गणपती विसर्जनासाठी करण्यात आला होता. परत जेव्हा २०१६ मध्ये भीषण पाणी टंचाई आली तेव्हा सुकाणू समितीनं प्रशासनाच्या मागे लागून या विहिरीचं खोलीकरण करुन घेतलं, गाळ काढून घेतला. मग या विहिरीतून गोरक्षणवासियांना पाणी मिळालं होते. रोज २० ते २५ टॅंकर शहरासाठी जाऊ लागले. पुन्हा पाऊस झाला अन सगळे या विह्ररीला पुन्हा विसरुन गेले होते. मग नंतर मनपाने वीज पुरवठा बंद केला. सोबतच पाणी काढायची मोटारही काढून नेली.
 
मात्र आज दुष्काळी स्थितीत या विहिरीत मुबलक पाणी आहे. मात्र शहरात बाहेरुन पाणी आणले जाते. पण शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या जीवंत आणि खात्रीच्या स्रोताकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. या भागातले नगरसेवकही याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. निवडणुकीपुरते येतात पुन्हा तोंडही दाखवत नाहीत असा आरोप या भागातील नागरिक करतात. त्यामुळे आता या विहिरीची योग्य काळजी घेतली आणि तिला स्वच्छ केले तर त्या भागातील नागरिकांचे काही प्रमाणात तहान भागवली जाऊ शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: नेते छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेणार

Operation Sindoor मुंबईत आज 'सिंदूर यात्रा' निघणार, अनेक सेलिब्रिटीही सहभागी होणार

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 2 ठार तर 4 जखमी

जळगाव : शिवसेना कार्यालयात 'भूत', गुलाबराव पाटील म्हणाले- अफवा बाजूला ठेवा आणि पक्षाच्या कामात सक्रिय रहा

मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईत भव्य 'महाराष्ट्र दर्शन' प्रदर्शनाचे उद्घाटन

पुढील लेख
Show comments