Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

थोडक्यात महत्वाचे… बोटाला शाई लावण्याच्या वेळी सावध -सचिन गोस्वामी

Webdunia
मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (14:58 IST)
शुक्रवारी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. पोलीस संरक्षणात असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.दरम्यान या प्रकरणावर विविध स्तरावरुन प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
 
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे कायमच चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते अनेकदा विविध विषयांवर भाष्य करत असतात. नुकतंच त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी भाष्य केले आहे. त्यांनी फेसबुकवर अप्रत्यक्षरित्या पोस्ट करत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
 
“थोडक्यात महत्वाचे… बोटाला शाई लावण्याच्या वेळी सावध आणि विचार पूर्वक कृती केली पाहिजे”, अशी पोस्ट सचिन गोस्वामी यांनी केली आहे. यात त्यांना कोणाचेही नाव घेता अप्रत्यक्षरित्या पोस्ट केली आहे.
 
सचिन गोस्वामी यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. “बरोबर, नाही तर तोंडावर शाई फेकन्याची वेळ येते”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने “शाई लावणाऱ्याला अक्कल पाहिजे ना सर तेवढी…!” असे म्हटले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments