Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गडचिरोलीत दोन लहान मुलांचे मृतदेह रुग्णालयातून खांद्यावर घेऊन आई वडील चालत घरी पोहोचले

child death
Webdunia
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (14:01 IST)
महाराष्ट्रातील गडचिरोलीत तापावर उपचारासाठी डॉक्टरांऐवजी पुजाऱ्याकडे दोन मुलांना नेले. काही तासांतच दोन्ही मुले मरण पावले.नंतर कुटुंबीय मुलांना घेऊन रुग्णालयात गेले. तिथे डॉक्टरांनी मुलांना मृत घोषित केले.मुलांचे मृतदेह घरी आणताना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मुलांचे पालकांनी मृतदेह खांद्यावर घेत 15 किलोमीटर चालत घरी पोहोचले. हे प्रकरण बुधवारचे अहेरी तालुक्यातील पत्तीगावातील आहे. 
 
अहेरी गावातील रहिवासी वेलादी कुटुंबातील दोन मुलं आपल्या आई वडिलांसह दोन दिवसांपूर्वी पत्तीगावात आले होते. या मुलांना 4 सप्टेंबर रोजी ताप आला. आई वडील मुलांना घेऊन डॉक्टरकडे न जाता एका पुजाऱ्याकडे घेऊन गेले. त्याने मुलांना काही वनौषधी दिल्यावर त्यांची तब्बेत खालावली. सकाळी 10:30 वाजता एका मुलाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा दुपारी 12च्या सुमारास झाला.नंतर त्यांना घेऊन पालक रुग्णालयात गेले. त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  

रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याने देचालीपेठातुन रुग्णवाहिका मागवण्यात आली असता पालकांनी ते घेण्यास नकार दिला आणि दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पायीच 15 किलोमीटर चालत पत्तीगांव घराच्या दिशेने निघाले.  नंतर त्यांच्या नातेवाईकाची बाईक मागवली आणि घरी पोहोचले. 

जिमलगट्टा रुग्णालयापासून पत्तीगावात जाण्यासाठी पक्की सडक नाही त्यामुळे चिखल आणि मातीतून जावे लागते. म्हणून मुलांचे मृतदेह घेऊन आई वडील पायीच निघाले.या प्रकरणाचा तपास पोलीस लावत आहे.
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

सर्व पहा

नवीन

दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल,या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी

सोलापूर : ९ वर्षांच्या मुलीने अवैध संबंध पाहिले, क्रूर वडिलांनी मुलीची हत्या करून गाडले

LIVE: पनवेलमध्ये कावीळचा प्रादुर्भाव

दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याची वेळ आली आहे, राजकीय टीका नंतर म्हणाल्या सुप्रिया सुळे

होय! मला माहिती आहे... ठाकरे-पवार ब्रँड नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहे, राज ठाकरेंचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments