Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकारच्या इतर घोषणांप्रमाणे सिंचनाची योजनाही फक्त घोषणाच राहू नये - जयंत पाटील

Webdunia
बुधवार, 19 जुलै 2017 (11:37 IST)

"लोकशाही आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने ठिबक सिंचनाला महत्त्व दिले होते. हजारो एकर जमीन ठिबक सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला गेला.  शरद पवार  केंद्रीय कृषीमंत्री असताना ठिबक सिंचनासाठी शेकडो कोटी रुपयांचे अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आले. ठिबकद्वारे पाणी वाचवले गेले पाहिजे, यात दुमत नाही. आज महाराष्ट्र सरकारने ठिबक सिंचनासाठी २५ हजार रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याची नुसतीच घोषणा न राहता त्याची अमलबजावणी व्हावी. कारण सरकारच्या घोषणा खूप आहेत, पण लोकांपर्यंत योजनेचे पैसे पोहोचत नाहीत. कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. यातही कर्जमाफी कशी, कधी, कोणाला आणि किती लागू झाली हे देखील अजून स्पष्ट झालेले नाही. भरमसाठ घोषणा करणाऱ्या सरकारच्या योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभदायी ठरत नाहीत हीच सर्वात मोठी अडचण आहे.
 

ठिबक सिंचनाचा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा आहे. पण हे करत असताना सरकार दरवर्षी बजेटमध्ये किती तरतूद करणार आहे, याचाही खुलासा राज्य सरकारने स्पष्टपणे केला पाहिजे."

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments