Marathi Biodata Maker

आंदोलकाच्या दुर्दैवी घटनेस पोलिस व प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा कारणीभूत - जयंत पाटील

Webdunia
मंगळवार, 24 जुलै 2018 (09:13 IST)
"मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आगर कांनडगांव इथे काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीच्या पात्रात जलसमाधी घेतली. ही घटना दुर्दैवी असून या आंदोलना दरम्यान प्राण गमवावे लागलेल्या शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा भावना प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या.
 
या घटनेच्या निषेधार्थ प्रशासनावर आरोपांच्या फैरी झाडताना ते पुढे म्हणाले, "आषाढी एकादशीलाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेस पोलिस व प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा जबाबदार आहे, आंदोलनकर्त्या तरुणांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने काकासाहेब शिंदे या आंदोलकाचा बळी घेतला आहे."
 
याआधी मराठा समाजाने शांतपणे लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले, इतके दिवस उलटूनही सरकारने अद्यापही मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. मराठा क्रांती मोर्चामधील तरूणांनी निवेदन दिले असताना आणि अशी घटना घडू शकते याबाबतची माहिती असतानाही प्रशासनाने कोणतीही आवश्यक खबरदारी घेतली नाही वा घटना रोखण्यासाठी पावले उचलली नाहीत, त्यामुळे प्रशासनाची दिरंगाईच यासाठी कारणीभूत असल्याची टीका आ. पाटील यांनी केली आहे.
 
"या सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या, मुस्लिम आणि लिंगायत समाजाचे आरक्षण प्रलंबित आहे. ओबीसी समाजातील सर्व घटकांना सरकारने फसवी आश्वासने दिली, आता मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. दलित समाजातही असंतोष आहे. आरक्षणाबाबत पुनर्विचार करण्याची भाषा केंद्रीय मंत्री करतात. सरकारची पलायनवादी भूमिका याला कारणीभूत आहे. त्यामुळे सर्वच समाजांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे. एवढी अशांतता, अस्थिरता याआधी महाराष्ट्राने कधी अनुभवली नव्हती," असा उद्वेग आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
 
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणतेही राजकारण करायचे नाही. आपल्या देशात लोकशाही आहे. तुम्ही मतांच्या माध्यमातून आपली नाराजी प्रकट करा, असे आवाहन त्यांनी आंदोलकर्त्या तरूणांना केले. तसेच सरकारने जनतेचा अंत पाहू नये, आरक्षणाबाबत त्वरित भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन आ. जयंत पाटील यांनी केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात आजपासून बस, एसटी, टॅक्सी आणि ट्रकचा संप

युद्धाची तीव्रता भारतात पोहोचली, अमेरिकन पाणबुडीने हिंदी महासागरात इराणी युद्धनौका बुडवल्याने ८० जणांचा मृत्यू

रंग लावायला गेलेल्या ४ वर्षाच्या मुलावर संतापलेल्या वृद्ध महिलेने उकळते पाणी ओतले; नागपूर मधील घटना

वर्ध्यात २३.२९ कोटी रुपयांच्या निधीतून भव्य वन इमारत बांधली जाणार; पालकमंत्री पंकज भोयर यांचे प्रयत्न

Rajya Sabha Elections शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार, काँग्रेस-यूबीटीचा पाठिंबा

पुढील लेख
Show comments