Dharma Sangrah

राम कदम खाली बसा, अवनीने तुमचा नंबर घेतला नाही - जयंत पाटील

Webdunia
गुरूवार, 29 नोव्हेंबर 2018 (08:36 IST)
विरोधक आणि सत्तधारी यांच्यात कलगीतुरा विधानसभेत पहायला मिळतो. मात्र कधी कधी जोरदार धक्का देखील देतात. असाच प्रकार आमदार राम कदम सोबत झाला आहे. अवनी वाघीण मृत्यू प्रकरणावरून जयंत पाटील यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर यावेळी बोलत होते, तेव्हा ते म्हणाले ‘प्रचंड मोठ्या प्रमाणावर यंत्रणा जंगलामध्ये पेरून देखील अवनी वाघिणीला तुम्ही ट्रॅन्क्वेलायझर न देता गोळ्या घातल्या’,अशा शब्दांत जयंत पाटील यांनी मुनगंटीवार ऐकवल. त्याच वेळी आमदार राम कदम अवनी वाघीण प्रकरणावरूनच जयंत पाटील यांच्या बोलण्यात अडथळा आणत होते.  पण विधान भवनामध्ये बोलण्याचा दांडगा अनुभव असलेल्या आणि कसलेल्या जयंत पाटलांनी एकाच मुद्द्यावर राम कदम यांचा अडथळा अगदी अलगद दूर सारला आहे. राम कदम बोलण्यात अडथळा आणत आहेत हे लक्षात येताच जयंत पाटील यांनी अवनी वाघिणीवरून थेट राम कदम यांच्या ‘फोन नंबर’ वक्तव्यावर उडी घेतली होती. राम कदम यांना सर्व आवेश बाजूला ठेऊन पुन्हा शांत होऊन जयंत पाटील यांचं भाषण ऐकत राहावं लागलं काय म्हणाले पाटील "जयंत पाटील म्हणाले….अध्यक्ष महोदय यांना खाली बसवा. अहो राम कदम, तुमचं कौतुक संपूर्ण महाराष्टट्र करतोय. अवनी वाघिणीने तुमचा फोन नंबर घेतला नाही, ही तुमची समस्या आहे. तुमचं कौतुक भाजपमधूनही होत आहे. त्याबद्दल तुम्हाला तोड नाही. तुम्ही खाली बसा.:"
राम कदम यांनी मुलींबरोबर लग्न करायचे मी लावून देतो त्यांना उचलून आणू असे कार्यकर्त्याना सांगितले होते सोबत माझा फोन घ्या असे वादग्रस्त आणि महिलांना अपमानित करणारे वक्तव्य केले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार १७३७ नवीन रुग्णवाहिका सुरू करणार

LIVE: विधान परिषदेतून ९ सदस्य निवृत्त होणार

नगरसेवकाचा मुलगा तीन वर्षांपासून अल्पवयीन मुलींचे शोषण करत होता, दक्षिण गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबईतील सर्व फेरीवाल्यांची पडताळणी होणार; बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

साताऱ्यात लोकशाहीची हत्या; मंत्री शंभूराज देसाई यांचा पोलिसांवर गुंडगिरीचा आरोप

पुढील लेख
Show comments