Dharma Sangrah

'पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो' हा रोग मोदींसह फडणवीसांना लागलाय - जयंत पाटील

Webdunia
सोमवार, 21 जानेवारी 2019 (09:37 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात बुलडाणा जिल्ह्यातून झाली असून बुलडाणा जिल्ह्यातील वरवट बकाल येथे पहिली सभा प्रचंड गर्दीमध्ये पार पडली..या सभेत उपस्थित समुदायाला संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, 'पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो' हा रोग मोदींसह फडणवीसांना लागलाय. त्यांनी मोदींच्या भाषणाची व्हिडिओ क्लीप ऐकवून भाजप सरकार आणि त्यांच्या घोषणा व त्यांच्या मंत्र्यांचे घोटाळे लोकांसमोर मांडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देदीप्यमान यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील सभेला प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, बुलडाणा जिल्हाध्यक्ष नाझीर काझी आदी नेत्यांसह वरवट बकाल, शेगांव, संग्रामपूर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते
 
समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे नाव द्या, अशी मागणी आ. धनंजय मुंडे यांनी केली.
 
हे भाजप सरकार बेरोजगारी वाढवतंय... तुमच्या नोकर्‍या घालवतंय... आधारभूत किंमत देत नाहीय... कापसाला दर नाही... तांदूळ, तुरीला बारदाने घेण्याची अक्कल या सरकारला नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा करणार अशी विचारणा जनतेला करतानाच विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला चांगलेच खडसावले.
 
या बुलडाणा परिसरातील खारपाण पट्टयातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत होते. या दुषित पाण्यामुळे अनेक गंभीर आजार झाले होते, ही बाब लक्षात आल्यावर माझ्याकडे पाणीपुरवठा खाते असल्याने मी इथल्या १४० गावांना स्वच्छ व चांगले पाणी दिल्याची आठवण अजितदादा पवार यांनी करुन दिली.आघाडीला गालबोट लागेल असं वक्तव्य करु नका. मोडता लगेच येते परंतु जोडताना दमछाक होते त्यामुळे याचा विचार करा असे आवाहनही मा. अजितदादा पवार यांनी केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय खळबळ; पार्थ पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचा बचाव केला, आरोप निराधार असल्याचे म्हटले

LIVE: जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मुंबईत उभारले जाणार

मुंबई : मालाडमध्ये 'ऍसिड होळी'; कामगारांमधील संघर्षात अनेक जण जखमी

हवामान विभागाने महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा गंभीर इशारा दिला

पुण्यात अवकाळी पावसाचे थैमान; जनजीवन विस्कळीत तर खडकवासला येथे सर्वाधिक ८८ मिमी पावसाची नोंद

पुढील लेख
Show comments