Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संभाजी भिडेंना अटक कधी होणार? - आ. जितेंद्र आव्हाड

Webdunia
सोमवार, 26 मार्च 2018 (16:23 IST)

मुंबईत आंबेडकरी जनतेचा मोठा ‘एल्गार’मोर्चा धडकला आहे. संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. भिमा-कोरेगाव प्रकरणाला अडीच महिने झाले, तरी संभाजी भिडे पोलिसांना सापडत नाहीत. सरकार संभाजी भिडेंना अटक कधी करणार? याचा खुलासा व्हायला हवा, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड  यांनी विधानसभेतील एका चर्चेदरम्यान केली.

 
भिडे स्वत: पत्रकार परिषद घेतात. सरकारला धमकी देतात. असे असूनही सरकार त्यांना अटक का करत नाही? सरकारला नक्की काय हवे आहे?, असा प्रश्न त्यांनी विचारला.
 
एकीकडे सरकार भिडेंना अटक करत नाही, तर दुसरीकडे मोर्चाला परवानगी दिली जात नाही. हे सरकार लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. रत्नागिरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. असे अनेक प्रकार राज्यात घडत आहेत. सरकारच्या संदिग्ध भूमिकेमुळे या साऱ्याला सरकारचा पाठिंबा आहे का? अशी शंका येते. अध्यक्षांनी सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments