Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजू शेट्टी काढणार 'किसान जागृती यात्रा'

Webdunia
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी किसान जागृती यात्रा संपूर्ण देशभर काढणार येणार आहे. यामध्ये सुमारे १३० शेतकरी संघटना सहभागी होत आहेत. प्रथमच संपूर्ण देशातील शेतकरी एकत्र येत आहे. या पाश्र्वभूमीवर स्वामिनाथन आयोगातील शिफारस म्हणजेच शेतकऱ्याच्या उत्पादनाच्या एकूण खर्चाच्या दीडपट हमीभाव त्याला मिळाला पाहिजे, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत, असे मत खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
 
सध्या शासन जी कर्जमाफी करण्याचा दावा करत आहे. पण ती निव्वळ फसवाफसवी असून, शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न शासन करत आहे, असा आरोप करून शेट्टी म्हणाले,  जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करत आहे, त्यांनी उर्वरित कर्ज ३० जून अखेर भरल्यानंतरच त्यांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे. असा अध्यादेश जारी करताना त्यासाठी केवळ दोन दिवसांची मुदत कर्जफेडीसाठी आहे. अशावेळी वेळेवर कर्ज भरणारा शेतकरीसुद्धा अचानक उर्वरित कर्जाची थकबाकी भरू शकणार नाही. याचाच अर्थ शासनाला अनुदान द्यायचेच नाही, असा होतो. म्हणूनच शासन केवळ शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत धूळफेक करीत आहेत. त्यामुळे आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारे कार्यकत्रे असून शेतकऱ्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments