Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूर पुढील २४ तासात धोकापातळी गाठण्याची शक्यता,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Webdunia
मंगळवार, 5 जुलै 2022 (21:38 IST)
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. धरणक्षेत्रात पाऊस वाढल्याने धरण साठ्यात वाढ होत आहे. यामुळे नदीपात्रात पाणी वाढण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण असेच सुरू राहिल्यास पुढील २४ तासात धोकापातळी गाठण्याची शक्यता आहे. म्हणूनच नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. तसेच ग्रामस्थांनी तलाठी व ग्रामसेवकांच्या संपर्कात राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे.
 
दरम्यान सायंकाळी चार वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी २६फूट ६ इंच इतकी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments