Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूर : रिकव्हरी कमी दाखवून महाडिकांनी 300 कोटींचा ढपला पाडला;-सर्जेराव माने

Webdunia
शनिवार, 22 एप्रिल 2023 (09:00 IST)
कसबा बावडा : उस उत्पादक सभासद हाडाची काडं करून राजाराम कारखान्याला साडेबारा ते तेरा रिकव्हरीचा उस घालतात. मात्र महाडिकांनी दीडने रिकव्हरी कमी दाखवून गेल्या 28 वर्षात 300 कोटीचा ढपला पाडला असा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी केला. शाहू परिवर्तन आघाडीच्या कुंभोज, भेंडवडेतील सभासद संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

माने म्हणाले, राजाराम कारखाना दरवर्षी सुमारे चार लाख टन उसाचे गाळप करतो. सभासद कारखान्याला चांगल्या रिकव्हरीचा ऊस घालतात. मात्र राजाराम कारखान्यात महाडिकांकडून रिकव्हरी 11.72 दाखवली जाते. म्हणजेच दरवर्षी 40 लाख किलो साखर उत्पादन कमी दाखवले जाते. या साखरेचा दर प्रतीकिलो 30 रुपये एवढा धरला तर वर्षाला 12 कोटी पेक्षा जास्त एवढी रक्कम होते. महाडिकांच्या 28 वर्षाचा सत्तेचा हिशोब केला तर जवळपास 300 कोटी रुपयांचा ढपला महाडिकांनी पाडला आहे.

कारखान्यात गाळप होणाऱ्या चार लाख टन उसापैकी तीन लाख टन उस कारखान्याच्या पाच किलोमिटर परिसरातच आहे. असे असतानाही वाहतूक खर्च जादा कसा काय? महाडिकांनी कारखान्याच्या सत्तेच्या माध्यमातून स्वत:ची घरे भरली. सभासदांना मात्र देशोधडीला लावले, अशी टीका माने यांनी केली.

Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मशिदीत दोन पायांवर येईल, पण स्ट्रेचरवर जाईल, वारीस पठाण यांची नितेश राणेंना उघड धमकी

Legends League Cricket : लेजेंड्स लीग क्रिकेटच्या सर्व सामन्यांचे तपशील जाणून घ्या

जालन्यात ट्रक आणि बसची भीषण धडक, 6 जणांचा मृत्यू; 17 जखमी

Ground Report : तिरुपतीच्या लाडू प्रसादात जनावरांची चरबी असलेले तूप, कमिशनच्या लालसेने श्रद्धेशी खेळ, काय आहे सत्य?

PM मोदींनी अमरावती येथे PM मित्र पार्कची पायाभरणी केली, आता कारागीर दाखवतील अप्रतिम कौशल्य

पुढील लेख
Show comments