Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लॉन्ग मार्च इगतपुरी तालुक्यात दाखल, मात्र अजूनही चर्चा नाहीच

Webdunia
मंगळवार, 14 मार्च 2023 (21:43 IST)
शेतकरी आणि आदिवासींच्या वन जमिनी प्रश्नांसाठी निघालेला लॉन्ग मार्च मोर्चा मंगळवारी मुंबईच्या दिशेने निघाला आहे. हा लाँग मार्च मुंबईपर्यंत धडकू नये यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही बैठक काही कारणास्तव रद्द झाली. हा लाँग मार्च आता मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. दरम्यान हे लाल वादळ मंगलवारी दुपारी इगतपुरी तालुक्यात दाखल होत घोटी शहरापर्यंत पोहचले.
 
रविवारपासून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून आदिवासींचे हे लाल वादळ विधिमंडळावर मोर्चा घेऊन निघाले आहे. सोमवारी नाशिक जवळील आंबे बहुला गावात रात्रीचा मुक्काम केल्यानंतर मंगळवारी सकाळी मोर्चेकरी मुंबईकडे निघाले. मोर्चात सुमारे दहा हजार आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. येत्या 23 मार्चपर्यंत मुंबई गाठण्याचे नियोजन आहे.
 
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पाच जणांचे शिष्टमंडळ  मुंबईकडे रवाना झाले असून मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहे. एकीकडे चर्चा सुरू असली तरी मोर्चा मात्र मुंबईच्या दिशेने चालतच राहणार असल्याचे मोर्चेकऱ्यानी सांगितले आहे.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments