Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दानवे यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसने जोरदार पलटवार, म्हणे अरे बाप्पा सिस्टर हळू!”

Webdunia
सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (16:33 IST)
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे  यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने रावसाहेब दानवे यांचा लस घेतानाचा फोटो शेअर करुन खिल्ली उडवली आहे.काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांची काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडताना गांधी यांचा उल्लेख देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड असा केला होता.
 
दरम्यान, यावरुन चौफेर टीका झाल्यानंतर दानवेंची स्पष्टीकरण देताना पुन्हा एकदा जीभ घसरली.एवढंच नव्हे तर राहुल गांधींना बैलाची उपमा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील नकळत बैल बोलून गेले.राहुल गांधी हे सांड बैल काम न करणारे.बैलाचे दोन प्रकार असतात, काम करणारा बैल आणि न काम करणारा बैल.सांड बैल म्हणजे न काम करणारा.सांडचा अर्थ यांनी जो कोणताही घेतला असेल आणि त्याचा जर विपर्यास केला असेल,तर मला असं वाटतं की आपलं अपयश झाकण्यासाठी कुणावर तरी खापर फोडणं हा काँग्रेसवाल्यांचा जुना धंदा आहे,असं दानवे म्हणाले.
 
दानवेंच्या स्पष्टीकरणानंतर आता काँग्रेसने जोरदार उत्तर दिलं आहे.काँग्रेसने रावसाहेब दानवे यांचा लस घेतानाचा फोटो शेअर केला आहे.यामध्ये काँग्रेसने “ज्या लोकांना साधी सुई देखील सहन होत नाही,ते देशासाठी छातीवर गोळ्या व बॉम्ब घेऊन अमर झालेल्या परिवारावर बोलतात.अरे बाप्पा सिस्टर.हळू!” असं लिहून दानवेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments