Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

10 लोकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्यांमध्ये आघाडीवर इंडिया जस्टिस रिपोर्ट -२०२०

Webdunia
शनिवार, 30 जानेवारी 2021 (07:46 IST)
न्यायदान प्रक्रिया ही खूप वेळ खाऊ असल्याने भारतात दरवर्षी हजारो खटले प्रलंबित राहतात, मात्र तरीही देशातील सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्यांमध्ये आघाडीवर आहे. त्यानंतर तामिळनाडू, तेलंगणा, पंजाब आणि केरळ यांचा क्रमांक लागतो. एक कोटीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांपैकी त्रिपुरा, सिक्कीम आणि गोवा ही राज्ये आपल्या नागरिकांना सर्वाधिक जलद न्याय देत आहेत. टाटा ट्रस्ट्सने तयार केलेल्या इंडिया जस्टिस रिपोर्ट -२०२० नुसार हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
 
या अहवालानुसार, सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची संख्या भारतात २९ टक्के आहे. तथापि, उच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची सरासरी ११ ते १३ टक्क्यांपर्यंतच वाढली आहे, तर सहायक न्यायालये २८ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढली आहेत. परंतु सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश एम.बी. लोकूर यांनी या अहवालाची प्रस्तावना लिहिली असून प्रलंबित खटल्यांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे.माजी न्यायाधीश लोकूर यांच्या मते, राष्ट्रीय न्यायालयीन डेटा ग्रिडनुसार जिल्हा न्यायालयात सुमारे ३ कोटी ८४ लाख खटले प्रलंबित आहेत. यामध्ये सर्व उच्च न्यायालयात प्रलंबित ४ लाख ४७ हजार प्रकरणे जोडली, तर ही संख्या सुमारे ४ कोटींच्या पुढे गेली आहे. या उदासिन अवस्थेला सामोरे जाण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात न्यायालयीन सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

7 रुपयांत इंटरनेट आणि कॉलिंगचा लाभ, या टेलिकॉम कंपनीने दिली जबरदस्त ऑफर

तिरुपती येथील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्री नायडूंचा खळबळजनक आरोप

अंधेरी लोखंडवाला कॉंम्प्लेक्स मध्ये भीषण आग

पुढील लेख
Show comments