Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र गारठला, परभणी पारा ५.६ अंश सेल्सियसवर

Webdunia
सोमवार, 21 डिसेंबर 2020 (16:36 IST)
उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र गारठला आहे. विशेषतः विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत कडाक्याची थंडी पडली आहे. परभणीतील तापमानाचा पारा ५.६ अंश सेल्सियस पर्यंत खाली आला असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे. 
 
सध्या उत्तर प्रदेशच्या पूर्व भाग, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशातील काही भागांत थंडीची लाट पसरली आहे. पुढील दोन दिवस या ठिकाणी थंडीची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
 
जम्मू- काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील बहुतांश भागात तापमानाचा पारा शुन्याच्या खाली घसरला आहे. दिल्लीतील तापमान ३.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. बर्फाच्छादित पश्चिम हिमालयीन क्षेत्रातून थंड वारे वाहात आहे. यामुळे थंडीची लाट पसरली आहे. 
 
२० डिसेंबर रोजी हवामान विभागाने नोंदविलेले तापमान (अंश सेल्सिअस) : मुंबई (कुलाबा) २१.८, रत्नागिरी २२.४, पणजी (गोवा) २०.३, जळगाव १२, कोल्हापूर १७.१, महाबळेश्वर १२.१, नाशिक १२.२, सांगली १६.५, सोलापूर १५.५, औरंगाबाद १२.४, अकोला १२.६, बुलढाणा १३.८, गोंदिया ७.४.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments