Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्राचा गारठा मुक्या प्राण्यांच्या जीवावर बेतत आहे, नगरमध्ये 20 मेंढ्यांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (14:59 IST)
कोणत्याही वातावरणात हातावर पोट असणारे मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी वणवण भटकताना दिसतात. प्रतिकूल वातावरणामध्येही मेंढपाळाचा हाच नित्यक्रम सुरु आहे मात्र वाढलेल्या गारठ्यामुळे अहमदनगर येथे एका मेंढपाळाच्या तब्बल 20 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तर कोकरेही आता अखेरच्या घटका मोजत आहेत. याशिवाय शेती व्यवसयाशी निगडीत असलेल्यांवर प्रतिकूल वातावरणाचा परिणाम दिसून येत आहे.
 
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नांदुर आणि खंदरमाळ परिसरात विसावा घेतलेल्या मेंढपाळाच्या बाबतीत ही दुर्देवी घटना घडली असून यात मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे अशा घटना घडत असून आर्थिक मदतीची मागणी होत आहे.
 
मेंढ्या झोपडीबाहेरत बांधलेल्या असल्यामुळे 20 लहान-मोठ्या मेंढ्या गारठ्याने मृत्युमूखी पडल्याचे मेंढपाळ म्हणाले. यात भारी नुकसान झाले असून आर्थिक मदतीची मागणी मेंढपाळांनी केलेली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Monsoon Update 2025: महाराष्ट्रातही वेळेपूर्वी मान्सून, IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

CJI यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉल मोडला, डीजीपी किंवा मुख्य सचिव आले नाहीत, गवई संतापले

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका! उपमुख्यमंत्री पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments