Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्जमुक्ती झाली, मुलीच्या लग्नाची चिंता नाही.. तुम्हीही लग्नाला या..

Webdunia
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (10:23 IST)
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा आरंभ मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सोमवारी झाला. त्यानिमित्त परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्य़ातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांना विचारले की, या योजनेचा लाभ घेताना काही त्रास झाला का.. किती हेलपाटे मारावे लागले, किती कर्ज होते, कुठल्या पिकाला कर्ज घेतले होते.
 
आधीच्या आणि आताच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये काय फरक जाणवला? त्यावर योजनेबाबत शंभर टक्के समाधानी असल्याची भावना अहमदनगर जिल्ह्य़ातील पोपट मुकटे यांनी व्यक्त करताना ‘मागील वेळेस पाच ते सहा वेळा चकरा माराव्या लागल्या. आता केवळ एका अंगठय़ावरच काम झाले,’ असे त्यांनी सांगितले.
 
परभणीच्या पिंगळी येथील विठ्ठलराव गरुड यांनी कर्जमुक्तीची रक्कम मिळणार असल्याने चिंता मिटल्याची भावना व्यक्त केली आणि मुलीचे लग्न जमले आहे, अशी आनंदाची बातमी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली. सोबतच दोघांना मुलीच्या लग्नाचे आमंत्रणही दिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

उद्धव ठाकरे नाशिक मध्ये गरजले, 'हिंदुत्व सोडलेले नाही, पण भाजपचे खोटे रूप स्वीकार्य नाही'

LIVE: उद्धव ठाकरे नाशिकमध्ये गर्जना करत म्हणाले हिंदुत्व सोडले नाही

आता विमानांमध्येही मिळणार मोफत वाय-फाय, विमान कंपनीची मोठी घोषणा

मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र अमरावतीमध्ये सुरू होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमरावती विमानतळाचे उद्घाटन केले

सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, २२ वर्षीय तरुणाला अटक;

पुढील लेख
Show comments