Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला – फडणवीस

Webdunia
मंगळवार, 5 एप्रिल 2022 (10:38 IST)
राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीत  होते. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील सरकारवर टीका करताना फडणवीसांनी मद्यविक्रीच्या, वीज कापणीच्या मुद्दयावर बोलताना हे सरकार असंवेदनशील असून, २०२२ ला राज्यात भाजपचं सरकार येईल असं म्हटलं. एवढ्यावर न थांबता, पुढे त्यांनी शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खूपसला असं म्हटलं आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी वेगवेगळ्या मुद्दयांवरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. ओबीसी आरक्षणावर बोलताना ते म्हणाले राज्य सरकारमुळे ओबीसी आरक्षणसमोर आव्हानं निर्माण झाली, मात्र आम्ही ते आरक्षण जाऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या मुद्यावर बोलताना त्यांनी वीज कापणीचा विषय उपस्थित करत सरकारला संवेदना नसल्याचा आरोप केला. तसंच बार मालकांना मविआ ससरकारने मदत केली, सरकारला बार मालकांची चतिंतका आहे मात्र शेतकऱ्यांची नाही असंही पुढे फडणवीस म्हणाले.
 
भाजप सरकारच्या काळात धान खरेदीत घोटाळा नव्हता. मात्र या सरकारच्या काळात घोटाळे झाले, सर्वसामान्य लोकांची चिंता या सरकारला नसून, ठाकरे सरकार नालायक असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता २०२२ मध्ये राज्यात भाजप सरकार येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुंबईतील नालासोपारा रेल्वे स्थानकावर तिकीट मागितल्यावर टीसीला हॉकी स्टिकने मारहाण

शुभमन गिलने स्फोटक शतक झळकावले, सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला

नाना पटोलेंचा PM मोदींवर मोठा आरोप, म्हणाले- अमरावतीचे PM मित्रा पार्क गुजरातला नेणार

चेन्नई कसोटीत 17 धावांच्या खेळीने विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 105, 95, 88 चा फॉर्म्युला, MVA मधील जागांचे वाटप ठरले !

पुढील लेख
Show comments