Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंबेडकर जयंती मिरवणुकीत भीषण अपघात, विजेच्या धक्क्याने 2 जणांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (10:07 IST)
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रॅली आटोपून घरी परतत असताना अनेकांना विजेचा धक्का बसला. विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. ही घटना विरार परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
मिरवणूक संपवून लोक घरी परतत होते
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विरारमध्ये बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. रात्री नऊ वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री साडेदहा वाजता संपली. कारगिल चौकातून मिरवणूक संपवून कामगार घरी परतत होते. त्यावेळी ट्रॉलीवर 6 जण उभे होते, त्यावेळी गाडीवरील लोखंडी रॉड जवळच असलेल्या इलेक्ट्रिक ट्रान्सफरवर आदळला, त्यामुळे संपूर्ण ट्रॉलीमध्ये विद्युत प्रवाह गेला.
 
 वाहनातील 6 जणांना विजेचा धक्का बसला
वाहनातील 6 जणांना विजेचा धक्का बसला. यामध्ये 30 वर्षीय रूपेश सुर्वे आणि 23 वर्षीय सुमित सुत नावाच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी 4 जण जखमी झाले असून, 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

IPhone खरेदी करण्यासाठी 18 वर्षाच्या मुलाकडून वृद्ध व्यक्तीची निर्घृण हत्या

पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फटाका फोडला, त्याच्यासोबत येण्यास नकार देत होती

नवरा रोज आंघोळ करत नाही, कंटाळून नववधूने 40 दिवसांतच मागितला घटस्फोट

देवेंद्र फडणवीस हे भाजपचे मुख्यमंत्री असतील गिरीश महाजनांचे विधान

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक चालकावर हल्ला करून लुटणाऱ्यांना अटक

पुढील लेख
Show comments