महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये सोमवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी नदीत एक कार कोसळली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये सोमवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी नदीत एक कार कोसळली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला. सर्वजण मुंबईहून देवरुखला जात होते. सोमवारी पहाटे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाने स्थानिक लोकांच्या मदतीने गाडी नदीतून बाहेर काढली.
पोलिस आणि स्थानिक लोकांनी क्रेनच्या मदतीने कार नदीतून बाहेर काढली. गाडी पूर्णपणे खराब झाली आहे. गाडीचे दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघात कशामुळे झाला हे अद्याप कळलेले नाही.
Edited By- Dhanashri Naik