Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तळीये गाव वसवण्याची जबाबदारी म्हाडा घेणार - जितेंद्र आव्हाड

Webdunia
रविवार, 25 जुलै 2021 (10:25 IST)
रायगडमध्ये तळीये गावात दरड कोसळून कित्येक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. येथील अनेक घरं दरडीखाली गाडली गेल्याने हे गाव उद्ध्वस्त झालं आहे.
 
दरम्यान,येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे,अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं.
 
या विषयी माहिती देताना ट्विट करत आव्हाड म्हणाले,"कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे.
 
"मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला की कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती," असं आव्हाड म्हणाले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

लाडूच्या वादाने दुःखी झालेले उपमुख्यमंत्री पवन कल्याण 11 दिवस उपवास करणार

डी गुकेशने फॅबियानोचा पराभव करत ऐतिहासिक सुवर्ण जिंकले

सोडा कारखान्याच्या पाइपलाइनमधून क्लोरीन गॅसची गळती

IND U19 vs AUS U19: भारतीय 19 वर्षांखालील संघा कडून ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव

कमला हॅरिसचे ट्रम्प यांना आणखी एका चर्चेचे आव्हान

पुढील लेख
Show comments