Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिरज : ३५०० खाऊच्या पानाला मिळाला ४५०० रु.विक्रमी दर!,शेतकऱ्यांना चांगला फायदा

Webdunia
सोमवार, 24 जुलै 2023 (08:36 IST)
मिरज तालुक्यातील  नरवाड  येथील पान‌ बाजारात झालेल्या सौंद्यात तानाजी चव्हाण पान‌ उत्पादक शेतकऱ्यांला ३५०० पानाला तब्बल  ४५०० रूपये मिळाले आहे. यामुळे पानमळा शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून पान विक्रीत तेजीत आली असून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.
 
नरवाड येथे बेडग, माळीवाडी, लक्ष्मीनगर, विजयनगर, म्हैसाळ अन्य भागात काही शेतकरी पानमळा शेती करतात.सदर पानांचा सौदा नरवाड येथे केला जातो.याठिकाणी परीसरांतील शेतकरी आपले पानांचे डाग आणतात.दररोज सायंकाळी या पानांचा सौदा संत बाळू मामा पान कंपनी नरवाड यांच्या वतीने केला जातो. सर्व पांन डागांचे एकत्रीकरण करून सौदा केला जातो व  जागेवरच पानांची बिल पट्टी शेतकऱ्यांना दिली जाते अशी माहिती संचालक नितीन खरमाटे यांनी बोलताना दिली.नंतर सदर पानांची विक्री करण्यासाठी मुंबई,पुणे बाजार पेठात पाठवली जाते असेही खरमाटे यांनी सांगितले.याठिकाणचे शेतकरी प्रामुख्याने कळी व‌ फापडा पानांचे उत्पादन घेतात.स्थानिक पातळीवर कळी पानाला मागणी असल्याने येथेच विक्री केली जाते. तर फाफडा पानाला मुंबई पुणे बाजार पेठात विक्री साठी पाठवले जाते.कोरोना काळापासून पानाला फारसा दर मिळत नव्हता.

मात्र या वर्षभरात पानाला चांगला दर मिळतो आहे.उत्पादन खर्च वजा जाता किमान ६० ते ७० टक्के रक्कम मिळते.परंतु अलिकडे  या कामासाठी कुशल व अनुभवी मजूर फारसे मिळत नाहीत.यामुळे मिळेल‌ त्यांना अधिक मजूरी द्यावी लागते.अशी माहिती तानाजी चव्हाण यांनी दिली.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुस्लिम अभिनेते आणि अभिनेत्रींच्या बहिष्कारावर संजय निरुपम यांनीही प्रतिक्रिया दिली

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

ट्रम्प यांच्या दाव्यावर संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला

नागपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'तिरंगा रॅली'चे केले नेतृत्व

Pakistani spy आठवी पास सिक्योरिटी गार्ड, ISI एजंट... कोण आहे नोमान इलाही ? ज्याने देशाविरुद्ध कट रचला

पुढील लेख
Show comments