Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुन्हा दाखल झाल्यानंतरही राज ठाकरेंनी ठोकला शड्डू; अखेर मनसैनिकांना दिले हे स्पष्ट आदेश

Webdunia
बुधवार, 4 मे 2022 (08:10 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी मनसैनिकांसाठीचे आदेश काढले आहेत. मशिदींवरील भोंगे उतरविण्याबाबत त्यांनी यापूर्वी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. ती मुदत आज संपत आहे. त्यामुळेच राज यांनी आता विशेष आदेश काढून मनसैनिकांना प्रामुख्याने 3 निर्देश दिले आहेत.विशेष म्हणजे, आज दुपारीच राज ठाकरे यांच्यावर औरंंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, राज्य सरकारने राज्यातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार, असा प्रश्न निर्माण होत होता. मात्र, राज यांनी कुठलीही पर्वा न करता आपल्या मनसैनिकांना हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले आहेत.
 
1. त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा
2. भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी. निवेदन पत्र रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत
3. मशिदीमध्ये बांगेला सुरुवात झाली की पोलिसांच्या 100 क्रमांकावर दूरध्वनी करून त्रासाबाबत तक्रार करावी, रोज.
 
राज यांच्या या आदेशामुळे आता मनसैनिक हनुमान चालिसा लावणार का, पोलिस प्रशासनाकडून मनसैनिकांचे अटकसत्र राबविले जाणार की आणखी काही घडणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. राज यांच्या निर्देशानुसार, 4 मे पासून मनसैनिकांनी अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात 4 मेचा दिवस अतिशय कळीचा राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

राज ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघात प्रचार करणार,आदित्य ठाकरेला आव्हान देणार!

IND vs BAN: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास,सुनील गावस्करांचा रेकॉर्ड मोडला

इस्रायलचा दावा- हिजबुल्लाचा कमांडर इब्राहिम अकील ठार

EY कर्मचाऱ्याच्या मृत्यूबद्दल अजित पवार यांची "तणावांमुळे तरुणांच्या मृत्यू" या विषयावर चिंता व्यक्त

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून टॅक्सी चालकाची आत्महत्या

पुढील लेख
Show comments