Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

8 ऑक्टोबरला मुंबईमधून मान्सून निरोप घेणार, हवामान विभागाची माहिती

Webdunia
शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (21:07 IST)
मान्सूनबाबत हवामान विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे. तर  8 ऑक्टोबरला मुंबईमधून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, 26 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. परतीच्या प्रवासात उत्तर मान्सून सक्रिय झाला आहे.
 
देशात जून महिन्यामध्ये पावसाने उघडीप दिली होती. परंतु, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने राज्यात धुमाकूळ घातला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील देशात पावसाने हजेरी लावली होती. देशातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अतवृष्टी देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
 
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. देशातील २४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा ६० टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 1 जूनपासून देशात सर्वच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments