Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकऱ्यांना झटका, आता 8 तासच वीजपुरवठा

Webdunia
मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (15:56 IST)
अलीकडे शेतकऱ्यांचे पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेत शेतीमालाला योग्य दर मिळत नाही. आणि अशा अवस्थेत देखील रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरवात झाली असताना आता शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. शेतकर्‍यांसाठी आता केवळ 8 तास वीजपुरवठा राहणार आहे.
 
आतापर्यंत शेतीसाठी 10 तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, ऐन रब्बीच्या तोंडावरच यामध्ये बदल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे.
 
दरवर्षी रब्बी हंगामाला सुरवात झाली की महावितणकडून हा निर्णय घेतला जातो. अशात पाणीसाठा असतानाही अडचणी निर्माण होणार आहेत. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने रब्बीच्या क्षेत्रातही वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 
 
रब्बी हंगामातील पिकांची जोपासना ही साठवूकीच्या पाण्यावरच करावी लागते. मात्र आता 1 नोव्हेंबरपासून नियमात बदल करुन शेतीसाठी 8 तासच विद्युतपुरवठा राहणार आहे.
 
कोळसा टंचाईचे कारण पुढे करीत ही वीज कपात करण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments