Marathi Biodata Maker

मुंबई -गोवा सागरी महामार्गावर 'शिवशाही' बस सुरु

Webdunia
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (16:19 IST)

ख्रिसमसचे औचित्य साधत मुंबई -गोवा सागरी महामार्गावर 'शिवशाही' बस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता ही बस मुंबई-मालवण मार्गावरही धावणार आहे.  मुंबई - पणजी 'शिवशाहीसाठी केवळ ९१३ रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहेत. त्यामूळे मुंबई-मालवण  सागरी मार्गावरील बसचे भाडेही तुलनेत कमी असणार आहे.
या वातानुकूलित बस प्रवासासाठी ६०० रुपये तिकीट दर ठेवण्यात येणार आहे. 'शिवशाही' बस अत्यंत आरामदायी वातानुकूलित असल्याने प्रवास आरामदायी होतो. त्यामूळे जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ  घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.ही बस बोरिवली येथून रोज सायं.४.३० वाजता सुटणार आहे. या बसचा मार्ग पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, पावस, आडिवरे, नाटे, जैतापूर, पडेल कॅण्टीन, जामसंडे , कुणकेश्वर, देवगडमार्गे मालवण असा असणार आहे. परतीच्या मार्गावर मालवणहून ही बस दुपारी ३ वाजता सुटणार आहे.
ही बस मुंबई सेंट्रल येथून रोज संध्याकाळी ५.०० वाजता सुटणार असून पनवेल, चिपळूण, लांजा, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी , बांदा, म्हापसा मार्गे पणजीला जाईल. तसेच पणजीहून दररोज संध्याकाळी ६ वाजता याच मार्गे परतीचा प्रवास करेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात खळबळ: आनंदमठ आश्रमाच्या प्रमुखावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप; पोलिसांकडून गुन्हा दाखल

अजितदादांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार भावूक! "तुमचं प्रेम प्रत्येक श्वासात जिवंत राहील"

LIVE: दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळाला

मराठा नेते मनोज जरांगे पाटील आज जंतर मंतरवर पोहचणार; नीट विद्यार्थी आंदोलनात सहभागी होणार

अहमदाबादमधील बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, १० जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments