Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई- पुणे- नाशिक सुवर्ण त्रिकोण पूर्ण करणार : मुख्यमंत्री

Webdunia
मुंबई, पुण्यासह नाशिकच्या विकासासाठी मुंबई- पुणे- नाशिक हा सुवर्ण त्रिकोण पूर्ण करण्याच्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचा आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीप्रसंगी ते बोलत होते.  
 
मुख्यमंत्री म्हणाले, मालेगांव तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. मालेगांवच्या सर्वांगिण विकासावर भर देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. येत्या काळात या संदर्भातील कार्यवाहीला गती देण्यात येईल. राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक येथील उपकेंद्र कार्यवाही करण्यासंदर्भात एक आठवड्यात निर्णय घेऊन त्याचा शासन निर्णय काढण्यात येईल. नदीजोड प्रकल्प, पाणी आरक्षण प्रश्नांबाबत स्वतंत्ररित्या बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत लोकप्रतिनिधींमार्फत आलेल्या सुचनांचा निश्‍चितपणे विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: राधाकृष्णन यांनी राहुल पांडेंसह तीन जणांना मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ दिली

राहुल गांधी भारतीय आहे की नाही? उच्च न्यायालयाने मोदी सरकारकडून मागितले उत्तर, दिला दहा दिवसांचा वेळ

राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांवर भडकले, म्हणाले २९ तारखेपर्यंत गप्प राहा

कोल्हापूर : प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलाचा अपघातात मृत्यू

नर्मदापुरममध्ये आई आणि मुलीचे मृतदेह आढळले, धारदार शस्त्राने हत्या

पुढील लेख
Show comments