rashifal-2026

मुंबई : जनजीवन पूर्वपदावर हळूहळू पूर्वपदावर

Webdunia
गुरूवार, 31 ऑगस्ट 2017 (11:08 IST)

पावसाचा तडाख्याने विस्कळीत झालेले मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रात्रभर पावसाची रिपरिप असल्याने रेल्वे वाहतूक अद्यापही पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. मात्र पाण्याचा निचरा होऊ लागल्याने आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू सुरु झाली असून मध्य रेल्वेने सीएसएमटी ते कल्याण मार्गावर दोन विशेष लोकल चालवल्या आहेत.  दुसरीकडे  मुंबईत डबे पोचवण्याची सेवा आज बंद ठेवण्यात आली आहे. 

रेल्वे गाड्यांचा प्रवास देखील रखडत रखडत सुरु आहे. 7 वाजून 26 मिनिटांनी पहिली विशेष लोकल कल्याणच्या दिशेने सोडण्यात आली. रात्रभर कार्यालयात मुक्काम केलेल्या नागरिकांनी लोकलने प्रवास करण्यासाठी गर्दी केली. सीएसटी ते ठाणे दरम्यान 'बेस्ट'ने विशेष बससेवा सुरु केली आहे.  

मंगळवारची रात्र अनेकांना कार्यालयात, मित्राच्या, नातेवाईकांच्या घरी, रेल्वे स्थानकावर काढावी लागली. रात्री उशिरापर्यंत लोकलमध्ये अडकलेल्या गर्भवती महिला, अपंग व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जीआरपीचे कर्मचारी कार्यरत होते. कुर्ला ते शीव स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलेले असल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूकीचा बोजवारा उडालेला आहे. मुंबई व परिसरातील शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे तर शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर न येण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

LIVE: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले

Maharashtra kesari 2026 : पुण्यात महाराष्ट्र केसरी साठी 1500 मल्ल भिडणार

इराण-इस्रायल युद्धामुळे हापूस आंबा निर्यात धोक्यात, कोकणातील शेतकऱ्यांची चिंता

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले, जनहित याचिका दाखल

सोलापुरात एसआरपीएफ जवानाची आत्महत्या, पत्नीच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments