Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईसह कोकण, पुणे, कोल्हापूरात जोरदार पाऊस

Webdunia
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (17:26 IST)

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.  दुपारी 2 च्या सुमारास अंधारून आल्यावर येऊन पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील दादर, वरळी, लालबाग, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, ठाणे, डोंबिवली भागात जोरदार पाऊस झाला. तसंच कांदिवली, बोरीवलीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. तसंच विलेपार्ले, सांताक्रुझ, अंधेरी, गोवंडी, चेंबूर आणि मानखुर्द परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. साकीनाका भागातही पावसाने हजेरी लावली असून पवई, कांजूरमार्ग भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू आहे. 

मुंबईसोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव-आंबेरी पुलावर मंगळवारी सकाळपासून पावसाचं पाणी आल्यानं माणगाव खोर्‍यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे.  तर  पुणे शहर व परिसरात रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून उपनगरांमध्ये जोरदार वर्षाव होत आहे. त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. खडकवासला, धनकवडी, कात्रज, सिंहगड रोड परिसरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे राधानगरी धरणाचे सात  स्वयंचलीत दरवाजे उघडण्यात आले आहेत. 12 हजार 196 क्यूसेक प्रति सेकंद  पाणी भोगावती पात्रात पडत असल्याने संध्याकाळ पर्यंत कोल्हापुर पद्धतीचे  बंधारे पाण्याखाली जाऊन अनेक मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीकाठावरील ग्रामस्थाना प्रशासनाचा सावधानतेचा इशारा  देण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

घरात घुसून धारदार शस्त्राने गळा चिरून महिलेची हत्या

महाराष्ट्रात २५ मे पर्यंत वादळांसह मुसळधार पावसाचा इशारा, आयएमडीने जारी केला इशारा

LIVE: कारगिलमधून बेपत्ता झाली नागपूरची महिला, सीमा ओलांडून पाकिस्तानात गेल्याचा संशय

कारगिलमधून बेपत्ता झाली नागपूरची महिला, सीमा ओलांडून पाकिस्तानात गेल्याचा संशय, मुलासोबत लडाखला गेली होती

वर्षाच्या अखेरीस होऊ शकतात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; प्रभाग रचना प्रक्रिया सुरू

पुढील लेख
Show comments