Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कुलगुरूंच्या राजीनाम्यासाठी बोंब मारो आंदोलन

Webdunia
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (11:42 IST)

आज मुंबई विद्यापीठाच्या परिसरात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणा देत 'बोंब मारो' आंदोलन केले. मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अनेक परीक्षांचे निकाल रखडले आहेत. उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासण्याचा प्रयोग यशस्वी ठरला नाही. त्यामुळे निकाल वेळेत लावणे शक्य झाले नाही. निकालांबाबत विद्यार्थी आणि पालकही अतिशय संवेदनशील असतात. या प्रकारात कुलपतींना लक्ष घालावे लागले. या साऱ्या प्रकाराला विद्यापीठाचा प्रमुख म्हणून कुलगुरू उत्तरदायी असले, तरी केवळ तेच याच्याशी संबंधित नसतात. विद्यापीठातील परीक्षा विभाग हा त्यातील मुख्य घटक आहे. या सर्व परीक्षांचे वेळापत्रक तयार करणे, त्यानुसार विद्यापीठात आणि संलग्न महाविद्यालयांत परीक्षा घेणे आणि नंतर वेळेत म्हणजे ४५ दिवसांत निकाल लावणे आवश्यक असते. हे सर्व प्रकार विद्यापीठांत नित्यनेमाने होत असल्याने त्याची यंत्रणा तयार असते. काळानुरूप परीक्षांच्या स्वरूपात किंवा तपासण्याच्या पद्धतीत बदल केला तरच त्याचा परिणाम होऊ शकतो. मुंबई विद्यापीठात सध्या तसेच काहीसे होत असावे. मात्र, त्याचा परिणाम विपरीत असेल, तर त्यावर विचाराची गरज आहे, असे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मटाले  यांनी सांगितले.

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

सर्वपक्षीय शिष्टमंडळावर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया

LIVE: नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

भारताच्या युकी भांब्रीने जोडीदार गॅलोवेसह शानदार कामगिरी उपांत्यफेरीत प्रवेश केला

नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

सोलापूरच्या एमआयडीसीमधील सेंट्रल इंडस्ट्रीला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments