Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Nanded : भरपावसात डोक्यावर ताडपत्री धरून पार्थिवावर अंत्यसंस्कार

Webdunia
बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (15:25 IST)
आपला भारत देशाने स्वातंत्र्यता मिळवून 75 वर्षे पूर्ण केली आहे. देश जरी प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत असला तरी ही आजही देशातील काही खेडेगाव मागासलेले आहे. त्यांच्या विकास झाला नाही. या गावात वीज नाही , पाणी नाही, रस्ते नाही, मूलभूत सुविधा तर नाहीच.या गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी व्यवस्थित जागा नाही. या ठिकाणी पार्थिवावर भरपावसात ताडपत्री धरून शेतात अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे दृश्य दिसले.

हे दृश्य आहे. नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यात भानेगाव तांडा येथील.या गावात दीड  हजार लोकांचे वास्तव्य आहे. हदगाव शहरापासून हे  गाव चार किमी वर आहे. या गावात रस्ते नाही, श्मशान भूमी देखील नाही. या गावातील बळीराम राठोड यांचे 25 सप्टेंबर रोजी निधन झाले. श्मशानभूमी नसल्याने शेतातच अंत्यसंस्कार केले जाते. अंत्यसंस्काराच्या वेळी पाऊस सुरु झाला आणि लोकांची धांदल उडाली. 

भर पावसात डोक्यावर ताडपत्री धरून मयत बळीराम राठोड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील लोकांनी प्रशासनाला या गावात काहीही सुविधा नसल्याचे सांगितले होते तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही असा आरोप या गावातील नागरिक करत आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Monsoon Update 2025: महाराष्ट्रातही वेळेपूर्वी मान्सून, IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

CJI यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉल मोडला, डीजीपी किंवा मुख्य सचिव आले नाहीत, गवई संतापले

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका! उपमुख्यमंत्री पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments