Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नर्मदेत प्रवासी बोट उलटली पाच ठार, ४० पेक्षा अधिक वाचवले

Webdunia
बुधवार, 16 जानेवारी 2019 (09:08 IST)
नर्मदा नदीमध्ये प्रवासी बोट उलटली आहे. या बोटीमधून ६६ जण प्रवास करत होते अशी माहिती समोर येत आहे. धाडगाव तालुक्यातल्या भुसा पाईंटजवळ ही घटना घडली आहे. यामध्ये ४२ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. इतर जण बुडाले असून त्यांचा शोध सुरु आहे. क्षमतेपेक्षा अधिक जण बोटीत बसल्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.  या बोट दुर्घटनेमध्ये ५ जणांचा बुडून मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.या घटनेत मरण पावलेल्यांमध्ये दोन लहान मुले, एक बालक, एक तरुण आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. ही दुर्घटना महाराष्ट्र हद्दीतील धडगाव तालुक्यात भूषा या गावाजवळील नर्मदा नदीच्या पात्रात घडली. या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सर्व प्रवासी महाराष्ट्रातील आहेत. या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी तातडीने धावून गेले.  भूषा येथे मकरसंक्रांतीनिमित्त नर्मदा नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. मंगळवारीही भाविकांची गर्दी झाली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात अनेक भागात ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी

International Day for Biological Diversity 2025 : जागतिक जैवविविधता दिन

उद्धव आणि राज पुन्हा एकत्र, शिवसेना यूबीटीने विश्वास दाखवत म्हटले- आता निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा असेल

Weather Alert महाराष्ट्रात अनेक भागात ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला

पुण्यात बॉम्बच्या धमकीमुळे घबराट, पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली

पुढील लेख
Show comments