Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकच्या मोडाळे व दरी ग्रामपंचायतीचा राष्ट्रीय पुरस्काराने होणार गौरव

Webdunia
शनिवार, 23 एप्रिल 2022 (21:54 IST)
पंचायत राज दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील मोडाळे व दरी ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात येणार आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींचे कौतुक करण्यात येत आहे.
 
देशपातळीवर (दि. २४) हा दिवस पंचायती राज दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजन करण्यात येणार असून राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या निमित्ताने मा. प्रधानमंत्री देशातील सर्व नागरिकांना वेबिनारद्वारे संबोधित करणार आहे. या दिवशी उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था व ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पुरस्काराने  गौरव करण्यात येणार आहे.
 
या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती मोडाळे ता.इगतपुरी, दरी ता. नाशिक या ग्रामपंचायतींचा गौरव केला जाणार आहे. सदर बक्षिसाची रक्कम PFMS द्वारे थेट ग्रामपंचायतींना वितरित होणार असल्याचे सांगितले आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या मोडाळे आणि दरी या गावांचे परिसरात कौतुक होत आहे.
 
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या पंचायती राज दिवस कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीस ऑनलाईन पद्धतीने नोंदणी आवश्यक असल्याने खालील वेब लिंक नोंदणी करावी आणि २४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२ वाजता नियोजित राष्ट्रीय पंचायती राज दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पालघर मध्ये केमिकल कारखान्यात गॅस गळती, १० कामगारांची प्रकृती खालावली

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments