Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे गोलमाल अगेन – नवाब मलिक

Webdunia
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (16:57 IST)

अद्यापही मुंबई विद्यापीठाच्या ११ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले गेले नाहीत. त्यामुळे या विद्यापीठाचा कारभार म्हणजे गोलमाल अगेन असेच म्हणावे लागेल असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  यांनी लगावला. विद्यापीठाच्या भोंगळ कारभारावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले.

मलिक म्हणाले की आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लागले आहेत त्यात मोठी तफावत जाणवली आहे. विद्यार्थ्यांच्या निकालात मोठ्या चुका आढळून आल्या आहेत. या परिस्थितीला राज्य सरकार तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या फेरीवालाविरोधी आंदोलनाबाबत बोलताना मलिक म्हणाले की मनसेला आता कोणी विचारत नाही, निदान या आंदोलनामार्फत तरी राजकीय यश मिळेल का यासाठी मनसे प्रयत्न करत आहे. फेरीवालाविरोधी आंदोलन जरी मनसेचे असले तरी मुख्यमंत्री त्याला हँडल करत आहेत असा आरोप मलिक यांनी केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments