Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’

Webdunia
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (12:59 IST)
मलिक यांनी कबूल है म्हणत ट्विट केलं, तर ज्ञानदेव वानखेडेंनी फोटो शेअर करुन केला खुलासा
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल सुरूच आहे. गेल्या महिनाभरापासून नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे यांच्यातील वाद सुरु आहे. 
 
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा केला आहे. हे सिद्ध करण्यासाठी अनेकदा मलिकांनी नवनवे पुरावे समोर आणण्याचा प्रयत्नही केला आहे. अशात आता मध्यरात्रीच नवाब मलिकांनी आणखी एक ट्विट केला आहे. मलिकांच्या ट्विटनंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडे यांचे काही फोटो शेअर केले आहेत.
 
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा मुस्लिम पोशाख घातलेला फोटो ट्वीटरवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. हा फोटो समीर वानखेडे यांच्या निकाहच्या वेळेचा असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यासंदर्भातले काही पुरावेही त्यांनी दिलेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या निकाहनाम्यावेळीचा फोटो ट्वीट करत कॅप्शनमध्ये , ‘कबूल है, कबूल है, कबूल है… यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’, असे लिहिले आहे.
 
 
ज्ञानदेव वानखेडे यांनी हे फोटो शेअर करुन आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो असं म्हटलं आहे.
 
याआधीही नवाब मलिक यांनी निरनिराळे पुरावे सादर करत वानखेडे मुस्लीम असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments