Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बहुचर्चित नवा पत्री पूल वाहतूकीसाठी २५ जानेवारीला खुला होणार

Webdunia
शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (21:56 IST)
मुंबईतील कल्याण आणि डोंबिवलीला जोडणारा बहुचर्चित नवा पत्री पूल वाहतूकीसाठी २५ जानेवारी रोजी खुला केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पूलाचे ऑनलाईन लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. या ऑनलाईन सोहळ्यात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत.
 
जुना पत्रीपूल हा ब्रिटीशकालीन होता. हा ऐतिहासिक पूल वाहतूकीसाठी धोकादायक असल्याचे रेल्वेने केलेल्या ऑडीटमध्ये उघड झाले होते. ऑगस्ट २०१८ मध्ये हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर मोठी यंत्रणा लावून नोव्हेंबर २०१८ मध्ये पूलाचे पाडकाम करण्यात आले. त्यानंतर या पूलाच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी आल्या. पूलाच्या कामाला लॉकडाऊनचाही सामना करावा लागला. १०० वर्षे जुना असलेल्या पत्री पूलाच्या जागी नव्याने उभारताना ७०० मेट्रीक टन वजनाचा गर्डर तयार करण्यात आला. हा गर्डर हैद्राबाद येथील कारखान्यात तयार करण्यात आला. कोरोना काळात हा गर्डर आणण्यासाठी विशेष परवानगी घेण्यात आली.
 
अनंत अडचणीवर मात करीत पूलाचे काम मार्गी लावण्यासाठी खासदार शिंदे यांनी कंबर कसली. या  पूलाचे काम रखडल्याने त्यावर अनेकांनी गाणीही तयार केली होती. तसेच विरोधकांनी पूलाच्या दिरंगाईमुळे शिवसेनेला लक्ष्य केले होते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महायुती आघाडीतील सत्ताधारी पक्ष महापालिका निवडणुका एकत्र लढतील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

तुर्की-चीनला बसले भूकंपाचे धक्के

LIVE: उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग

उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे उरी एका भुताच्या शहरात रूपांतरित झाले

पुढील लेख
Show comments