Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिजड्यांला मुले होतील मात्र सिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही - गडकरी यांचे वादग्रस्त विधान

Webdunia
निवडणुकीनंतर नितीन गडकरींना पंतप्रधान करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न असल्याची सध्या राज्यात जोरदार  चर्चा आहे. तर दुसरीकडे गडकरींची काही वादग्रस्त विधानं चर्चेत आहेत. गडकरी यांनी कर्जबुडव्या विजय मल्ल्याची बाजू घेऊन सारवासारव केली होती. ते संपत नाही तोच आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. एक वेळ हिजड्याला मुलं होतील. मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. मात्र भाजपा सरकारनं सिंचन योजना पूर्ण करुन दाखवली, असं गडकरी सांगलीतील एका कार्यक्रमात म्हणाले आहेत.  
 
गडकरी हे शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते.  सिंचनावर बोलत असताना गडकरींची जीभ घसरली आहे. गडकरी हे टेंभू सिंचन योजनेविषयी बोलत होते.  गडकरींनी वादग्रस्त विधान केलं. 'टेंभू योजना अनेक वर्षांपासून अर्धवट होती. ही योजना कधी पूर्ण होईल, असं आम्हालादेखील वाटलं नव्हतं. खरंतर हे इथे बोलू नये. पण बोलतो. एकवेळ हिजड्याचं लग्न झालं तर त्याला मुलं होतील. पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही. मात्र भाजपासरकारच्या काळात ही योजना पूर्ण झाली. शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. टेंभूसारख्या अनेक महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजना भाजपा सरकारच्या कार्यकाळात पूर्णत्वास गेल्या,' असं गडकरी म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

तिरुपतीनंतर सिद्धिविनायकाच्या प्रसादावरून गोंधळ! लाडूच्या पाकिटांवर उंदीर सापडले, व्हिडिओ व्हायरल

नवीन मोबाईलची पार्टी न दिल्याने मित्रांनी केला अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून

आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरमुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ, नेत्यांनी प्रतिक्रिया दिली

पुणे विमानतळाचे नाव बदलणार, तुकाराम महाराजांच्या नावाने ओळखले जाणार

महाराष्ट्रात आरक्षणासाठी धनगर जमातीचे आंदोलन शेळ्या-मेंढ्या घेऊन आंदोलक रस्त्यावर

पुढील लेख
Show comments