Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यभरातील तापमानात वाढ नाही

no change
Webdunia
बुधवार, 11 मार्च 2020 (09:48 IST)
पुढील आठवडय़ापर्यंत राज्यभरातील तापमानात वाढ होणार नसल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुढील दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
फेब्रुवारीच्या अखेरीस राज्यातील तापमानात विचित्र बदल झाले होते. किनारपट्टीसह मुंबईच्या तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर मुंबईचे तापमान पुन्हा खाली उतरले. तर गेल्या आठ दिवसात मुंबईचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० अंशाच्या दरम्यान होते. त्यामध्ये पुढील चार दिवसात फारसा बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. गेल्या दहा वर्षांत मार्च महिन्यात मुंबईचे सर्वाधिक कमाल तापमान ४० अंशापर्यंत नोंदविण्यात आले होते, तुलनेने यावर्षी पहिल्या पंधरवडय़ात तापमानात फार मोठी वाढ झालेली दिसत नाही.
 
सध्या उत्तर-पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. दरम्यान मंगळवारी मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत किचिंत वाढ झाली. राज्याच्या उर्वरीत भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आई सोबत प्रियकराला अटक

LIVE: मुंबईत 'सिंदूर यात्रा' काढली जाणार

‘भारत धर्मशाळा नाही...’, श्रीलंकेतून येणाऱ्या तमिळ निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री योगी यांचा मोठा निर्णय, गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधणार

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

पुढील लेख
Show comments