Dharma Sangrah

राज्यभरातील तापमानात वाढ नाही

Webdunia
बुधवार, 11 मार्च 2020 (09:48 IST)
पुढील आठवडय़ापर्यंत राज्यभरातील तापमानात वाढ होणार नसल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुढील दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
फेब्रुवारीच्या अखेरीस राज्यातील तापमानात विचित्र बदल झाले होते. किनारपट्टीसह मुंबईच्या तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर मुंबईचे तापमान पुन्हा खाली उतरले. तर गेल्या आठ दिवसात मुंबईचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० अंशाच्या दरम्यान होते. त्यामध्ये पुढील चार दिवसात फारसा बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. गेल्या दहा वर्षांत मार्च महिन्यात मुंबईचे सर्वाधिक कमाल तापमान ४० अंशापर्यंत नोंदविण्यात आले होते, तुलनेने यावर्षी पहिल्या पंधरवडय़ात तापमानात फार मोठी वाढ झालेली दिसत नाही.
 
सध्या उत्तर-पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. दरम्यान मंगळवारी मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत किचिंत वाढ झाली. राज्याच्या उर्वरीत भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

अजित पवार असताना त्यांच्या घराबाहेर काळी जादू करण्यात आली होती; पुतण्या रोहित पवारांचा दावा

छत्रपती संभाजीनगरमधील पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली

LIVE: छत्रपती संभाजीनगरमधील पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांना बॉम्बस्फोटाची धमकी

महाराष्ट्रात ॲसिड हल्ल्यातील पीडितांची ओळख उघड करणे गुन्हा ठरणार तर ऑनलाइन लैंगिक छळासाठी कठोर शिक्षेची तरतूद; विधेयक मंजूर

भोंदू बाबा अशोक खरात दहावीच्या गणितात नापास, नावही बदलले, गुणपत्रिका समोर आल्याने धक्कादायक खुलासा

पुढील लेख
Show comments