Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट प्रवाशाजवळ नसल्यास कर्नाटक महाराष्ट्रातील प्रवाशांची नो एंट्री

Webdunia
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (16:25 IST)
कर्नाटक सरकारने कोगनोळीजवळ राष्ट्रीय महामार्गावर तपासणी नाका उभा केला आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांची तपासणी या ठिकाणी होत आहे. ७२ तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट प्रवाशाजवळ नसल्यास त्यांना या तपासणी नाक्यावरूनच परत महाराष्ट्र पाठवून देण्यात येत होते. त्यामुळे सकाळी १० वाजता कोगनोळी राष्ट्रीय महामार्गावर एकच गोंधळ उडाला होता. तपासणी करण्यात येत असल्याने वाहनांच्या रांगा लागुन, वाहतुक खोळंबा होत आहे.
 
महाराष्ट्र, केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमाणपत्र नसल्यास कर्नाटकात प्रवेश देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानुसार कर्नाटक सरकारच्या पोलिस प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथून प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांना परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे.
 
त्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह जवळपास ५० कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. हे कर्मचारी याठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांकडून प्रमाणपत्राची विचारणा करत आहेत. तसे प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनधारकांना कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यास मज्जाव घालून परत माघारी महाराष्ट्रात पाठवून देत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments