Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कितीही चौकशा लावा, घाबरत नाही - शरद पवार

Webdunia
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (09:25 IST)
ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही, त्या ठिकाणी ईडी, सीबीआय अशा वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून चौकशा लावण्याचे प्रकार केंद्र सरकार करत असते. सत्तेचा दुरुपयोग करून स्थानिक सरकारचा उपमर्द करण्याचे काम ते नेहमी करतात; पण त्यांना किती चौकशा लावायच्या त्या लावू देत. त्यामुळे अशा चौकशांना आम्ही घाबरत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरासाठी आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, "सरकार हे आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि सर्वजण एकत्रित लढले, तर पुढील सरकारही महाआघाडीचेच येईल.
"सरकार स्थापन झाल्यानंतर दोन दिवसात, मग दोन महिन्यांत, नंतर एक वर्षात पडणार, असं भविष्य अनेक जण वर्तवित होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही अधूनमधून भविष्य वर्तवित असतात. ते ज्योतिष पाहण्याच्या क्षेत्रात गेले तर चांगले होईल," असा टोला पवार यांनी हाणला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रेमविवाह योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद जी महाराज म्हणाले, जर त्यांच्या मुलांनी असे पाऊल उचलले तर पालकांनी काय करावे?

अपमृत्युहरं महामृत्युञ्जय स्तोत्रम Apamrutyuharam Mahamrutyunjjaya Stotram

४ जून रोजी महेश नवमीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, या ३ राशींचे बिघडलेले काम पूर्ण होईल

तूळ राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासहित

सतत बसण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवते, सतर्क व्हा

सर्व पहा

नवीन

LIVE: सुवर्णपदक विजेत्या महिला प्रादेशिक वन अधिकारी (RFO) अवघ्या 40 दिवसांत निलंबित

नागपूरच्या सीजीओ कॅम्पसमध्ये बॉम्बच्या धमकीमुळे दहशत,सुरक्षा यंत्रणा सतर्क

रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा भव्य सोहळा झाला,संभाजीराजे छत्रपती यांनी केले आवाहन

आईचे लज्जास्पद कृत्य, प्रियकराकडून १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करवला

ठाकरे बंधू एकत्र येतील ! शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत केले मोठे विधान

पुढील लेख
Show comments