Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारच्या हातालाच नव्हे तर मेंदूलाच लकवा मारला, चंद्रकांत पाटलांची टीका

Webdunia
बुधवार, 5 जानेवारी 2022 (08:59 IST)
सांगली येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. “या सरकारची बुद्धी चालत नाही. तसेच कोणतेही निर्णय या सरकारकडून घेतले जात नाहीत. या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. त्यामुळे या सरकारच्या हातालाच नव्हे तर मेंदूलाच लकवा मारला आहे. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.
 
आता मात्र संपूर्ण महाविकास आघाडी सरकारलाच लकवा भरल्याची स्थिती आहे. आताचे सरकार कोणतेच निर्णय घेत नाही. एसटी आंदोलनापासून मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासारखे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. परंतु, हे सरकार त्यावर कोणताही निर्णय घेत नाही. या सरकारच्या हाताला नाही तर मेंदूलाच लकवा मारला आहे.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments