Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हणून अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहत नाहीत

Webdunia
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (16:17 IST)
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडी गेल्या अनेक दिवसांपासून नोटीस बजावत आहेत. त्यांच्या निवासस्थानी छापेमारी देखील करण्यात आली. परंतु अद्याप ते चौकशीसाठी ईडीसमोर हजर झालेले नाहीत. देशमुख यांनी नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाला ते चौकशीसाठी हजर का राहत नाहीत, याचं कारण सांगितलंय. त्यांनी म्हटलंय की, पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने त्यांच्याविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईपासून ते पळत असल्याची धारणा दूर चुकीची आहे. या प्रकरणात जर ईडी निष्पक्षपातीपणे तपास करणार असेल, तर आपण तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं.
 
न्यायमूर्ती नितीन एम जमादार आणि सारंग व्ही कोतवाल यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद करताना अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी म्हणाले, “अनिल देशमुख ईडीपासून आणि कारवाईपासून पळत असल्याचा गैरसमज मी दूर करू इच्छितो. कोणताही वैयक्तिक हेतू नसणाऱ्या लोकांकडून देशमुखांची चौकशी केली जावी. कारण ईडी निष्पक्षतेच्या मूलभूत मापदंडांचे पालन करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाचा हस्तक्षेप असणं आवश्यक आहे. तसेच देशमुख यांना जबरदस्तीच्या कारवाईपासून सुरक्षा देण्यात आली पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली.
 
दरम्यान, देशमुखांवर ईडी चौकशी काही अधिकाऱ्यांकडून मनमानीने आणि सूडबुद्धीने केली जात आहे, असा आरोप अनिल देशमुख यांच्या वकिलांनी केलाय. तसेच ईडी न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी अनिल देशमुख हे वाईट व्यक्ती असल्याचं दाखवण्यासाठी माध्यमांना निवडक खुलासे करत आहे, जेणेकरून त्यांच्याबद्दल चुकीची सार्वजनिक धारणा निर्माण होईल, असाही आरोप त्यांनी केलाय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments