Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जाणता राजा नव्हे, तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा म्हटलं जाईल : सदाभाऊ खोत

Webdunia
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020 (09:10 IST)
"शरद पवार यांनी खरं बोलावं. कारण ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पवारांना शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे, तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा म्हटलं जाईल", अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सांगलीत भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेमध्ये ते बोलत होते. 
 
यावेळी शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेणारे नेते असल्याचं खोत म्हणाले. "पवार साहेबांचं काही मनावर घेऊ नका. ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलटं करतात. त्यांनी जर म्हटलं की सूर्य उद्यापासून पूर्वेकडे उगवणार तर सूर्य पश्चिमेकडे उगवणार. पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात मार्केट कमिट्या बंद झाल्या पाहिजेत, शेतकऱ्यांचा शेतमाल कुणालाही खरेदी करता आला पाहिजे असं म्हटलंय. पण दुसरीकडे पवार म्हणतात की त्यांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. त्यामुळे शरद पवारांचं आत्मचरित्र वाचावं की न वाचावं असा प्रश्न पडलाय", असं सदाभाऊ खोत म्हणाले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments