Marathi Biodata Maker

देशातील सर्वात मोठी बाजरपेठ लासलगाव बाजार समिती अनिश्‍चित काळासाठी बंद

Webdunia
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (16:51 IST)
व्यापारी वर्गाकडे शेतकर्‍यांना देण्यासाठी लहान स्वरूपातील चलन नसल्याने आशिया आणि देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयदत्त होळकर यांनी दिलेली आहे.
 
पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यातील पंधरा बाजार समित्यांत १०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये प्रामुख्याने उन्हाळ कांद्याची विक्री होत असून, हा कांदा एप्रिल व मेमध्ये साठवणूक केलेला आहे. त्यामुळे तो खराब होत असून, शेतकर्‍यांना हा कांदा विक्री करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातच नवीन लाल कांदा बाजार आवारात येण्यास सुरुवात झाल्याने व तो टिकाऊ नसल्याने काढणीनंतर शेतकर्‍यांना हा कांदा लगेच विक्री करावा लागत आहे. मका, सोयाबीनची काढणी जोरात सुरू आहे. येत्या हंगामाची तयारी करण्यासाठी बी-बियाणो व रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी, तसेच दैनंदिन आर्थिक गरजा भागविण्यासाठी शेतकर्‍यांना सध्या पैशांची आवश्यकता असल्याने शेतकरी हा शेतीमाल मोठय़ा प्रमाणावर विक्रीस आणत आहे. अशा परिस्थितीत चलन तुटवड्यामुळे लिलाव बंद राहिल्यास येथील शेतकर्‍यांची माल विक्रीची गैरसोय होत आहे. चलन पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यामुळे शेतीमाल लिलावाबाबत अनिश्‍चितता निर्माण झालेली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना लावला 'पूर्णविराम'; शशिकांत शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली

LIVE: पुण्यातील ७१० कोटी रुपयांचा कात्रज-कोंढवा रस्ते प्रकल्प भूसंपादनातील अडथळ्यांमुळे रखडला

'लाडकी बहीण योजना' बंद करा... मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला असे का म्हटले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

राईड रद्द केल्यावरून गदारोळ: पुण्यात पाच जणांचा रॅपिडो चालकावर हल्ला; दगडांनी मारून केले जखमी

मुकुल चौधरी कोण आहे? ज्याने षटकारांचा वर्षाव करत कोलकाता विरुद्ध खेचून आणला विजय, सोशल मीडियावर नवा 'टायगर' म्हणून ट्रेंडिंग

पुढील लेख
Show comments