Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशातील जनताच मोदी सरकारला घरी बसवेल : मोहन जोशी

Webdunia
गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (07:29 IST)
केंद्रातील मोदी सरकार कृषी कायद्याबाबत आडमुठी भुमिका घेत आहे. हे कायदे रद्द करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु आडमुठे सरकार शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाही. आंदोलना दरम्यान अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील जनता नक्कीच मोदी सरकारला घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी केले. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी विश्रांतवाडी येथे शहर कॉग्रेस कमिटी वडगावशेरी मतदारसंघाच्यावतीने धरणे आदोंलन घेण्यात आले. त्यावेळी जोशी बोलत होते.
 
जोशी म्हणाले की, देशातील सर्वसामान्यांना मिळणारे अन्नधान्य देखील बंद करण्याचा घाट मोदी सरकार घाट घालत आहे. यामुळे देशात सामान्य लोकामध्ये सरकार विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. शेतकरी आंदोलन ही सामान्य नागरिकांच्या हिताचे आहे. यामुळे देशात कॉॅग्रेस शेतकार्‍यांना पाठिंबा देत आहे.जर सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकार्‍यांच्या विरोधात केलेले कायदे मागे घेतले नाहीत, तर राज्यसह देशात आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

इस्रायलचा पुन्हा गाझावर हल्ला, ८२ जणांचा मृत्यू

दिल्ली ते मुंबई-हावडा अंतर कमी होणार, दोन्ही मार्गांवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने आवश्यक ती मान्यता दिली

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुणे: विहिरीत पडलेला बिबट्याच्या पिल्लूला वाचवल्यानंतर जंगलात सोडले

पुढील लेख
Show comments