Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील'- तुषार भोसले यांचे अजित पवारांना आव्हान

Webdunia
रविवार, 13 जून 2021 (10:36 IST)
फोटो साभार -सोशल मीडिया 
आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नसून हा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील, असा इशारा भाजप प्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी दिला आहे.
 
मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत यंदा पायी वारीला परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने वारी करण्यास परवानगी दिलेली नाही.
हा निर्णय घेऊन राज्य सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे, अशी टीकाही तुषार भोसले यांनी केलीय. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
राज्य सरकारने आपली भूमिका मागे घेतली नाही तर असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील आणि यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास याला उमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील असं आव्हान तुषार भोसले यांनी दिलं आहे.
 
राज्यातील मानाच्या दहा पालख्यांसाठी बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी 20 बसेस दिल्या जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मुंबईत फेसबुकवर लाईव्ह येऊन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bank Holiday In October : ऑक्टोबर मध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार, यादी पहा

मुंबईत रेल्वे अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक, नऊ लाखांचे नुकसान

राहुल गांधी यांच्या जीवाला धोका शिवसेना युबीटी नेते संजय राऊत म्हणाले

ठाण्यातील एका व्यावसायिक इमारतीच्या11 व्या मजल्यावर आग

पुढील लेख
Show comments