Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चौघांच्या अंगावर वीज कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू

Webdunia
मंगळवार, 29 जून 2021 (09:01 IST)
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, पालघर यांसह अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यात गुरे चारण्यासाठी गेलेल्या चौघांच्या अंगावर वीज पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.  
 
एकाचा मृत्यू, तिघांची प्रकृती स्थिर
डहाणू तालुक्यातील ओसरविरा मानकर पाड्यात दुपारी 4 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यावेळी वीज अंगावर पडून रविंद्र बच्चू कोरडा (15) याचा जागीच मृत्यू झाला. तर मेहुल अनिल मानकर (12), चेतन मोहन कोरडा (11), दिपेश संदीप कोरडा (14) या तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या या तिघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना जवळच्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 
ही चारही मुले ओसरविरा येथील मानकर पाड्यातील आहेत. काल हे चौघेजण गुरे चारण्यासाठी शेतावर गेले होते. मात्र शेतातच वीज पडून रविंद्रचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

रेल्वेने बदलले 'वंदे मेट्रो'चे नाव,आता हे नाव असेल

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, उद्या सकाळी 11 वाजता नाव जाहीर होणार!

भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला11 लाख रुपये देण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कोण आहेत ?

पुढील लेख
Show comments