Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंढरपूर : कार्तिकी वारीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन

Webdunia
शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (08:42 IST)
कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने येणा-या जास्तीत जास्त वारकरी भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे, यासाठी यात्रा काळात देवाचा पलंग काढून ठेवला जातो आणि मंदिर दर्शनासाठी अहोरात्र उघडे ठेवले जाते. देवाच्या राजोपचारामुळे भाविकांची दर्शन रांग थांबू नये यासाठी राजोपचारही बंद केले जातात. या प्रथेप्रमाणे काल (गुरुवार) पासून भाविकांना विठुरायाचे 24 तास दर्शन सुरु करण्यात आले. 30 नोव्हेंबरपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर अहोरात्र उघडे ठेवले जाणार आहे.
 
आषाढी आणि कार्तिकी यात्रांच्या वेळी लाखो भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत जाते. भाविकांना तासन्तास रांगेत थांबावे लागते. हे लक्षात घेऊन या दोन्ही यात्रांच्या वेळी जास्तीत जास्त भाविकांना देवाचे दर्शन घेता यावे, यासाठी देवाचा पलंग काढून ठेवला जातो आणि देवाच्या पाठीशी लोड ठेवला जातो. या प्ररंपरेप्रमाणे काल देवाच्या शेजघरातील पलंग काढून देवाच्या पाठीशी लोड तर रुक्मिणीच्या पाठीशी तक्क्या ठेवण्यात आला. मंदिर आजपासून 30 नोव्हेंबरपर्यंत अहोरात्र उघडे ठेवण्यात येणार आहे.








Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments