Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गेल्या १८ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने ‘वैद्यनाथ’च्या कर्मचाऱ्यांकडून कारखाना बंद, संकटात पंकजा मुंडे

Webdunia
बुधवार, 10 मार्च 2021 (16:15 IST)
परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १८ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याची बाब समोर आली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या या कारखान्याने पगार न दिल्याने कर्मचाऱ्यांनी आज बुधवारी कारखाना बंद केला आहे. पगार नाही तोपर्यंत कारखाना सुरू करणार नसल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनूसार, परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी कारखान्याचे कार्यकारी संचालकांना निवेदन दिले होते. वैद्यनाथच्या कर्मचाऱ्यांचा गेल्या १८ महिन्यांपासून पगार थकीत आहे. पगार १० दिवसांत आमच्या खात्यात वर्ग करा अन्यथा आम्ही कारखाना बंद करू असा इशारा निवेदनात देण्यात आला होता. दहा दिवस होऊनही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळ पासूनच कारखाना बंद केला. या संपात वजन काटा, सर्व कार्यालयाचे कर्मचारी, उत्पादन युनिटचे कर्मचारी सहभागी झालेत.
 
दरम्यान, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी अत्यंत मेहनतीने उभा केला. या कारखान्याने उत्पादनाचे अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. यामुळे कारखान्याचे नाव आशिया खंडात झाले होते. दरम्यान, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर कारखान्यासमोर गेल्या काही वर्षापासून अनेक अडचणी निर्माण झाल्यात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

राज्यातील गरिबांना मिळणार नवीन घरे, नवीन गृहनिर्माण धोरण मंजूर, कोणाला फायदा होईल ते जाणून घ्या

मुंबईत ५३ कोरोना रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली, बीएमसीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

LIVE: मुंबईत ५३ कोरोना रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली, बीएमसीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

कलियुगातील आईचे क्रूर कृत्य, प्रियकराकडून अडीच वर्षांच्या मुलीवर दुष्कर्म केल्यानंतर हत्या

महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, आता CIBIL स्कोअर नसतानाही कर्ज उपलब्ध होणार

पुढील लेख
Show comments